एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रुढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल एवढेच स्थान होते. महिलांना समाजात कोणताही दर्जा दिला जात नव्हता, अशा वेळी महिलांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. अशा या महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. Savitribai Phule Nibandh Marathi या विषयावर आज आपण निबंध लिहिणार आहोत. आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी चे लेखन आजच्या मराठी निबंध या लेखणात असणार आहे. या माहितीचा उपयोग आपण सावित्रीबाई फुले या विषयावर भाषण करण्यासाठी तसेच निबंध लेखन करण्यासाठी होणार आहे.