महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात २०१४ पासून 'सुकन्या योजना' सुरु करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या मुलींसाठी असणाऱ्या केंद्र शासनाच्या सरकारी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुकन्या योजना ही 'माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना' या योजनेत विलीन करून १ ऑगस्ट २०१७ पासून ही योजना सुरु आहे. या बद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये दिली आहे.
{tocify} $title={Table of Contents}
माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना संपूर्ण माहिती | Majhi Kanya Bhagyashree Yojana in Marathi
योजनेचे नाव | मिळणारे लाभ | प्रमुख अटी |
---|---|---|
'माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना' | 1.) एक मुलगी असल्यास - 18 वर्षे कालावधीसाठी रु. 50,000 2.) दोन मुली असल्यास - प्रत्येक मुलीचे नावे 25 हजार रुपये एकुण रु. 50,000 | 1.) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक. 2.) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 7.50 लाख. 3.) कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. |